Monday 29 August 2011

ऊस आणि चरक



     माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती माझ्याकडे आली आणि मला सांगायला लागली की अमूक - अमूक व्यक्तिने त्यांच्या आईवडीलांचे फार हाल केले आहेत . आणि ते त्यांच्या कडून पाहावल्या जात नाही . आणि मग बोलण्याच्या ओघात ती मला सांगायला लागली की, बघं असं असतं ! आई वडीलांची तुलना उसाशी केली जाऊ शकते . आणि मुलं म्हणजे कोण तर रस काढणार चरक असतो.
     रस काढणारा हाताने तो रस काढत असतो . त्यामध्ये जेव्हा सुरुवातीला उस टाकतो . त्यामधून भरपुर रस येतो . मग पुन्हा त्याला दुमटतो आणि पुन्हा रस बाहेर पडतो . चिरकांड्या उडतात आणि पुन्हा मग जेव्हा अधिकाधिक वेळा तो ऊस त्या चरखामध्ये जातो तेव्हा मात्र रस बाहेर येत नाही . मग उरतो तो केवळ चोथा ! निरुपयोगी निष्फळ आणि मग कचर्‍याच्या पेढीमध्ये तो चोथा फेकुन दिला जातो .
     मुलं ही अशीच असतात , ती आई वडीलांना उसाप्रमाणे समजतात . जेव्हा आई वडील तरुण असतात . मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आईवडीलकडे भरपूर देण्यासारखं काही असत म्हणुन ती मुलांना प्रिय असतात . परंतू जसं जसं वय होत जातं तसं तसं आई वडीलाजवळ देण्यासारखं काही उरत नाही . आणि मग मुलं त्यांना चोथा म्हणुन सोडुन देतात .
     कुठ रस्त्यावर तर कुठे वृध्दाश्रमात किंवा कधी कधी फारच द्याळू असेल , तर घराच्या ओसरीत . खरोखरच ! हे वागणे बरे आहे काय ? आईवडीलांना चोथ्याप्रमाने समजून फेकून देणार्‍यांच्या वाटेला पुढची पिढी तसेच वागणार नाही का ? जर आम्ही आमच्या आईवडीलांना उसाच्या चोथ्याप्रमाने कचरा पेटीत फेकत असु, तर आमच्याही वाटेला तसेच दिवस येणार नाही का ? याचा खरोखरच विचार करणे गरजेच आहे. आईवडीलांना निरुपयोगी समजुन त्यांना घरांबाहेर घालविणारे लोक खरोखर शहाणे आहेत काय ? 


3 comments:

  1. atishay sundar! aaj chya vastusthiti la dharun aahe.

    ReplyDelete
  2. ya goshtila aai-vadilanni mulawar kelele sanskar dekhil jababdar aahet

    ReplyDelete