जगात अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत . लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले म्हणुन जग़ आज त्यांना वंदन करते . त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून लोक मार्गक्रमन करतात . काहीनी अपार पराक्रम गाजविले म्हणुन त्यांचा गौरव केला जातो.
महापुरुषांचे जिवन चरित्र मला नेहमीच आकर्षण वाटत रहिले आहे. कित्येक महापुरुषांच्या जीवनचरित्राचा मी अभ्यास केला. त्यांच्या चरित्र्यामध्ये मला काही समान दुवेही सापडले .
महाभारतातील कर्ण , एकलव्य , आधूनिक काळातील म. फुले , म. कर्वे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या चरित्र्यामधिल समान दुवा म्हणजे शिक्षणासाठी त्यांना करावे लागलेले कठोर परिश्रम .
कर्ण सुतपुत्र म्हणुन द्रोणाचार्याने शिष्यत्व नाकारले . शेवटी खोटे बोलून का होईना अन्यत्र गुरुकुलात प्रवेश मिळवावा लागला. एकलव्य महान पराक्रमी परंतू अर्जुनाला स्पर्धक नको म्हणून गुरुदक्षिणेच्या नावाखाली द्रोनाचार्यानी अंगठा कापून घेतला.
म. फुले माळी जातीतले . शुद्राने शिकुन काय करायचे ? म्हणून शिक्षणाला घरातून आणि घराबाहेरुन विरोध . म . कर्वे यांना शिक्षणासाठी प्रचंड पायपीट करावी लागली.
डॉ. बाबासाहेबांना आज जग वंदन करते परंतू त्याच्या शालेय जिवनात त्यांना एका कोपर्यात बसून शिक्षण घ्यावे लागले. शाळेतील नळाचे पाणी प्यायला बंदी , फळ्याला हात लावायला मनाई . सातत्याने विटाळ होईल या शब्दांचा भडिमार !
शिक्षण घेतांना या सर्व महापुरुषांना अनंत अडचणी आल्या . पण ते खचले नाही. कर्ण सर्वश्रेष्ट धनुहीर बनला . एकलव्य अर्जुनाला तोडीस – तोड ठरला . म. फ़ुलेंनी स्त्री – शुद्रांच्या शिक्षणांची मुहुर्तेमेढ रोवली . कर्वेनी महिला शिक्षणाची पताका उचलण्याची बाबासाहेबांनी अस्पृशांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
आज शिक्षण सर्वासाठी खुले आहे. तरी मुलांनी शाळेत यावे म्हणुन शिष्यवृत्ती , फी – माफी , खिचडी अशा योजना राबवाव्या लागतात . शिक्षण सहज मिळू लागले परंतू नवे फुले , नवे बाबासाहेब घडताना दिसत नाही . एखादी गोष्ट सहज मिळू लागली की, तिचे महत्त्व राहत नाही , ते यालाच म्हणत असावे .
No comments:
Post a Comment