Saturday 30 July 2011

आधुनिक बोधकथा - कोळी डोह आणि हिरे



 
एक गाव होते त्या गावामध्ये एक कोळी राहायचा . गावाच्या शेजारी नदी होती . नदीमध्ये एक डोह होता . हा डोह अत्यंत खोल होता . एक बाज विनायला जेवढी दोरी लागते तेवढी या डोहाची खोली आहे . अशी गावात वदता होती . कोळी दररोज सकाळी पाच वाजता उठायचा , खांद्यावर जाळे टाकायचा आणि डोहावर मासेमारी करण्यासाठी जायचा . डोहाच्या खोलाची त्याला पुर्ण कल्पना होती .
असाच एकेदिवशी भल्यापाहाते हा कोळी उठला . खांद्यावर जाळे टाकले आणि डोहाकडे चालु लागला. अजुन सुर्योदय झाला नव्ह्ता . रस्यावर अंधारच होता . पण सवयीचा रस्ता असल्यामुळे हा कोळी सहजगत्या पावले टाकत होता .
डोहाकडे चालत असतांना कोळ्याचा पाय कशालातरी ठेचाळला. त्याने ज्यामुळे ठेच लागली त्यावस्तू कडे पाहण्याचा प्रयत्न केला. पण अंधारामुळे त्याला स्पष्ट दिसू शकले नाही . परतू स्पर्शामुळे ती खड्याने भरलेली पिशवी  आहे . हे त्याला जाणवले. ज्या खड्याच्या पिशविला तो ठेचाळला होता . ती पिशवी सोबत घेवून तो डोहाकडे पुन्हा चालू लागला . डोहापर्यत पोहोचला .
अजुन अंधारच होता . जाळे टाकता येणे शक्य नव्हते . सहज म्हणून त्या कोळ्याने ती खड्याची पिशवी उघडली . तीच्यामधले काही खडे हातात घेतले . विरंगुळा म्हणून एक खडा त्या अतीखोल डोहाच्या पाण्यात फेकला . डबकन आवाज झाला. कोळ्याचे मनोरंजन झाले . एक एक खडा तो डोहात फेकू लागला . आवाज होत होता . आता शेवटचा खडा फ़ेकण्यासाठी त्याने हातात घेतला . तो खडा चमकून उठला . मुळात तो खडा नव्हता हिरा होता . कोळ्याने आतापर्यत डोहात फेकले होते लाख मोलाचे हिरे . पण ते परत मिळविता येणे शक्य नव्हते . आम्हच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हिर्‍याइतका मौल्यवान . काळ त्या खोल डोहासारखा . न वापरलेला प्रत्येक क्षण काळाच्या खोल डोहात जावुन पडतो . येणारा प्रत्येक क्षण हिर्‍याइतका मौल्यवान मानुन त्याचा सार्थ उपयोग करुया !  
 for more articles pl. visit my blog  preranakhawale.blogspot.com 

Thursday 28 July 2011

आधुनिक बोधकथा - खोबरे




नागपंचमीचा सण होता . आईने मला दुकानातुन ओले नारळ आणायला सांगीतले मी वाण्याकडे जावुन घेवुन आले .
आज मी आणलेल्या नारळावर जरा जादाच काथ्या होता . हातात पेचकच घेवून, त्याच्या मदतीने मी नारळावरचा काथ्या काढू लागले . काथ्या त्या नारळाला घट्ट चिकटलेला होता . मोठ्या परिश्रमानंतर तो काथ्या , त्या नारळापासुन मी वेगळा केला . एक मजबुत दगड मांडला . त्या दगडावर  तो आदळला.  कवटी फ़ुटली तेव्हा कुठे आतले  चवदार , पांढरेशुभ्र खोबरे हाती आले .
त्या नारळाकडे पाहात मी विचार करु लागले. नारळाच्या सर्वात वर काथ्या आणि त्याखाली कवटी आहे . वरचा काथ्या काढावा लागतो . कवटी फ़ोडीवी लागले . त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात . तेव्हा कुठे फ़ळ म्हणून हाती खोबरे येते. म्हणजे परिश्रमानंतरच खरे फ़ळ हाती लागते .
वरवर कमी महत्वाची वस्तू आणि आतमध्ये अधीक मौल्यवान वस्तू अशीच निसर्गाची रचना असल्याचे दिसून येते . केळ्याचे साल बाजूला केल्याशिवाय आतला गर मिळत नाही . संत्रा , मोसंबी इ. फ़ळांची साल बाजूला सारावी लागते , तेव्हाच कुठे या फ़ळांचा आस्वाद घेता येतो .
जमीनीत वरच्या बाजूला खडक असतो . अत्यंत परिश्रमापुर्वक हा खडक फ़ोडून काढावा . तेव्हा कुठे जमीनीच्या आत गोड पाण्याचे , झरे लागतात .
प्रुथ्वीच्या पोटात मौल्यवान रत्नाच्या खाणी आहेत . परतू त्यासाठी कठोर परिश्रम घेवून वर वरची माती आणि खडक बाजुला सारावे लागतात . तेव्हा कुठे ही मौल्यवान रत्ने हाती लागतात .
आमच्या आयुष्यामध्ये यश म्हणजे नारळातील खोबरे परंतू हे या यशावर नानाविध अडचणींचा काथ्या आणि कवटी झाकलेली असते . हा काथ्या काढावा लागतो . कवटी फ़ोडावी लागते . म्हणजेच कठोर परिश्रमाने अडचणींवर मात करावी लागते . कुठे यशाचे खोबरे आमच्या हाती लागते . आयुष्यात जर यशाचे खोबरे खायचे असेल तर अडचणींचा काथ्या दुर सार्‍यावाच लागेल .


Monday 25 July 2011

मराठी बोधकथा - सासू



 मी दहावीला असतांना आईला मी एकदा म्हणाले , काय ग ! तुम्हां सुनांना सासु नकोशी का वाटते ? सासु एका सुनेला नकोशी वाटेल परंतु जगामधल्या सर्वाच सुनांना सासु ही जवळ जवळ नकोशी का वाटते ? तेव्हा आई चटकन म्हणाली, अग ! सासु या शब्दाची फोड करुन पहा. सासु म्हणजे सारख्या सुचना . जी सारख्या सुचना देत राहते ती सासु . आता सुचना ऎकायला कुणाला आवडेल ?

      माझ्या डोक्यात चटकन प्रकाश पडला की,  हे खरे आहे . सासु तिचे वय अधिक तिने अधिक जग पाहिलेले आणि तिला असे वाटतं माझ्याजवळ अनुभवाचं गाठोड आहे . हे भांडार मी सुनेला दिले पाहिजे . तर सुनेला त्याच वेळेला वाटत की मी तरुण आहे . माझ्या अंगी उत्साह आहे . काही तरी करण्याची उमेद आहे . मला स्वतंत्रपणे काम करु द्या . मला सारख्या सुचना देउ नका आणि या दोन प्रव्रुत्ती मधुन जो दंव्द निर्माण होते त्या द्व्दातुन सासू सुनेच वैर  आपल्याला पाहायला मिळतं .
  
      जगामध्ये कुणालाही सुचना दिलेल्या आवडत नाही . कारण सुचना स्विकारल्यामुळे कुठेतरी व्यक्तीचा अहंकार दुखावल्या जाउ शकतो . सुचना देणारा व्यक्ती ही आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे . आपण कनिष्ठ आहोत . त्याला आपल्यापेक्षा जास्त कळते . त्याने दिलेल्या सुचना पाळायला पाहिजे . ? अशी भावना सुचना स्विकारणार्‍याच्या मनात निर्माण होते . सुन जेव्हा घरामध्ये नविन असते तेव्हा सासू तिला कुटुंबाचे रिती रिवाज , विधी , चालीरिती या गोष्टी समजावून सांगते आणि ती नविन असल्यामुळे मुकाटपणे ती सर्व ऎकुण घेते . ह्या सुचना ग्रहण करते . परंतु  जशी - जशी सुन जुनी होत जाते तशी तशी तिची ऎकण्याची प्रव्रुत्ती , सुचना स्विकारण्याची प्रव्रुत्ती कमी होत जाते . तिला तिच्या निर्णय प्रक्रियेचा घाला वाटतो . तिचा अहंकार दुखावल्या जातो .

सासू सुनेचे नाते टिकुन ठेवायचे असेल, तर जगातील सर्व सासवांनी आपल्या सुनांना सुचना देण्याचे कटाक्षाने टाळले पाहिजे . जर सुचना देण्याचे प्रमाण कमी झाले तर सासु सुनांच्या नात्यामध्ये नक्कीच गोडवा निर्माण होउ शकेल .

तसेही जेव्हा वय वाढत जाते तेव्हा बोलण्याच प्रमाण कमी झालं पाहिजे. परंतू जगामध्ये मात्र आपल्याला उलट पाहायला मिळते जसं जसं वय वाढत तसतशी माणसं अधिकाधिक सुचना द्यायला लागतात . परंतु जर नाती टिकवायची असतील, तर मात्र सुचणांचे प्रमाण कमी असले पाहिजे . असेच आपल्या या सासु या शब्दातून दिसुन येते .

शब्द किती अर्थपुर्ण असतात त्या त्या शब्दामध्येच त्या शब्दांची व्याख्या देखील लपलेली असते .सासू  सारख्या सुचना आणि सुन म्हणजे सुचना नको असलेली आता जिला सुचना नको आहेत तिला सारख्या सुचना देवुन काय उपयोग ! हे जर सासवांनी जाणून घेतलं तरच सासु सुनेच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण हो शकेल .



मराठी बोधकथा - पाण्याचा रंग





कापड हा कित्येकांच्या जीव्हाळ्याचा विषय. आपल्याला हवे तसे कापड मिळावे म्हणुन लोक उन्हाळ्याच्या भर उन्हात, दुपारी एका दुकानातुन दुकानात भटकताना दिसतात .
     
     कपडे खरेदी करताना आम्ही जेवढे कपड्याचा पोताला महत्व देतो त्यापेक्षा अधीक महत्व कपड्याच्या रंगाला देतो . कापड कितीही चांगले असेल् पण त्याचा रंग जर मनासारखा नसेल,  तर आपण ते कापड निवडणार नाही.  याउलट मनासारखा शेड मिळाला म्हणुन , कमी पोताचे कापड खरेदी करणारे कित्येक जण सापडतील . मला कापडाचा पोत गुणासारखा वाटतो आणि कापडाचा रंग भावनेसारखा ! रंगावर भाळुन जेव्हा एखादी व्यक्ति कमी पोताचे कापड खरेदी करते. तेव्हा गुणांवर भावनेने मात केली, असेच मला वाटते.

      असो ! एकदा मला साडी खरेदी करावयाची होती. मैत्रिणी सोबत दुकानात गेले.        निळ्या काळपट रगाच्या साडीची निवड केली. साडी घरी आणली . टेबलावर ठेवली. उन्हाळा जाणवत होता. पाणी प्यायला घेतले. आणि पिताना थोडे पाणी साडीवर सांडले साडीवर पाणी सांडल्यामुळे साडीचे काही नुकसान होणार नव्हत . मी चट्कन सांडलेले पाणी पुसुन काढले. पण साडीत जेवढे पाणी मुरायचे तेवढे मुरलेच आणि साडीचा काही भाग ओला झाला .

साडीचा ओला झालेला भाग स्पष्ट  दिसत होता . पाण्याला कोणताही रंग नाही . पण पाण्याने ओले झालेले मात्र स्पष्ट दिसत होते . मी काळजीपुर्वक पाहिले. माझ्या लक्ष्यात आले की, ओला झालेल्या भागावरील रंग अधीक चटक दिसत होता. अधीक उठावदार  दिसत होता.

साडीच्या रंगावरुन आणि पाण्यावरुन माझे मन महाराष्टाच्या भुगोलावर आणि पाण्यावर धाव घेवु लागले. जेथे पाणी सांडले आहे अर्थात जेथे धरणे बनली आहेत, त्या भागाचा नकाशावरील रंग अधिक हिरवागार झाला आहे . कारण त्या पाण्याने बागा फुलवल्या आहेत . आहे की नाही पाण्याची गंमत ! त्याला रंग नाही पण रंग देण्याची अद् भुत क्षमता मात्र त्यात आहे !