Sunday 14 August 2011

मराठी बोधकथा चला डोळे तपासुया !





माणुस इतकी प्रगती करु शकला याचे कारण त्याचा उन्नत मेन्दु . पण एकटा उन्नत मेन्दुच मानवाच्या आतापर्यंतच्या प्रगतीला कारणीभुत ठरला असे नाही. मानवाने उन्नत अवयवही त्याच्या प्रगतिसाठी तितकेच सहाय्याभुत ठरले आहेत. मेन्दु ने केलेला विचार कृतित आणण्यासाठी शेवटी अवयवच कामी येतात . अन्यथा मानवाच्या मेन्दुपेक्षा जास्त वेगाने विचार करु शकणार्‍या एखाद्या संगणकानेही अधिक वैयक्तिक प्रगती करुन दाखविली असती पण तसे होताना दिसत नाही .

तसे आपल्या शरिराचे सगळेच अवयव महत्वाचे म्हणावे लागतील . कान नसतील तर ऐकू येणार नाही . जीभ नसेल तर बोलता येणार नाही . हात नसतील तर काम करता येणार नाही . आणि पाय नसतील तर चालता येणार नाही . पण या सगळ्या अवयवापेक्षा मला डोळे अधिक महत्वाचे वाटतात . कारण आपण जेवढे द्यान ग्रहण करतो त्यापैकी अधिकाधिक द्यान आम्ही डोळ्यावाटे ग्रहण केलेलेच असते . डोळे नसतील तर सर्वत्र काळोख .

निसर्गालाही डोळे अत्यत महत्वाचे वाटले म्हणुन त्याने त्याना कवटीच्या सुरक्षीत खोपडीत, सर्वोच्च स्थानी विराजमान केले . डोळ्याना कोणतीही इजा होवू नये . त्यावाटे दुरवरचे दिसावे अशी निसर्गाची यामागची योजना असल्याचे दिसून येते.
आम्हाला दोन डोळे आहेत. परतु दोन डोळ्यानी पाहुन ही जी वस्तु आम्ही पाहतो, ती जर एक असेल, तर आम्हाला एकच दिसते. दोन वस्तु दिसत नाही, तसे पाहिले तर दोन डोळ्याना दोन वस्तु दिसावयास होत्या , पण तसे होत नाही .  एकाच्या जागी जर दोन वस्तु दिसायला लागल्या तर डोळ्यात बिघाड झाला आहे . असे मानुन आम्ही डोळे तपासण्यासाठी डॉक्टराकडे धाव घेतो .

एक असणारी वस्तु एकच दिसली पाहिजे हा आमचा आग्रह . मग , जगात परमेश्वर एकच आहे ! तर अनेक थोर महात्म्यानी वारवार सागुनही आम्हाला हिन्दुचा देव वेगळा , मुसलमानाचा देव वेगळा , ख्रिश्चनाचा देव वेगळा, असे वेगवेगळे देव पाहण्याची सवय का लागली आहे. सर्व धर्मीयाना देव एकच का दिसत नाही. चला डोळे तपासुन घेवुया ! काही बिघाड आहे वाटते !

1 comment:

  1. pan mag sarvach dharmiyanche dole tapasave lagatil...kahinna tar jaad bhingancha chashma lagalai

    ReplyDelete