‘ बशिर बद्र ’ यांनी त्यांच्या एका शेर मध्ये म्हटले आहे . “ घरापासुन मस्जीद दुर आहे , चला एखाद्या रडणार्या लहान बालकाला हसवू या ! ” म्हणजेच रडणार्या लहान बालकाला हसायला लावणे हे ईश्वराची नमाज पढण्याइतकेच तोलामोलाचे काम आहे , असे बशिर बद्र यांना म्हणावयाचे आहे.
हसणे आणि रडणे हे आयुष्यारुपी स्थायी दोन चाके आहेत . आयुष्यात केवळ रडणे असेल, तर आयुष्याचा आनंद घेता येत नाही आणि आयुष्यात केवल हसणे असेल , तर आयुष्य निरस झाल्याशिवाय राहणार नाही . शेवटी गोड पदार्थांना चव कवी म्हणुन काही प्रमाणात मिठ घालावेच लागते.
आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा हसणे आणि रडणे हे दोन्हीही आम्ही मुक्तपणे करतो . हसतांना कोण काय म्हणेल ? आणि रडतांना इतरांना कसे वाटेल ? याचा आम्ही विचार करत नाही . वाढत्या वयाबरोबर विचार वाढू लागतात आणि मग आम्ही रडतांना चारदा विचार करतो . भावना लपविण्याचा प्रयत्न करतो . आणि हसतांनाही जरा जपूनच हसतो . परिणामत: या भावना दाबल्या जातात . आणि जगामध्ये दमन हे अत्यंत वाईट . दाबलेले कोणत्या वाटे बाहेर पडेल याचा नेम नसतो . म्हणून हसणे , रडणे या भावनांना मुक्त बाब मिळणे गरजेचे आहे.
हसणे आणि रडणे या दोन्ही क्रियामध्ये चेहर्यावरिल स्नायुंचा वापर होतो. हसणे – रडणे यामुळे या स्नायुंना व्यायाम मिळ्तो. रडणाच्या तुलनेत हसतांना अधिक स्नायुंचा वापर होतो. म्हणून निदान अधिक स्नायुंचा व्यायाम मिळावा म्हणून हसलेले बरे ! या जगात आम्ही पदापर्ण केले ते रडत रडत . आम्ही जेव्हा मरण पावतो तेव्हा आजुबाजूचे सगे – सोयरे टाही फ़ोडतात . जीवनाच्या सुरुवातीला आणि शेवटी रडणे ठेवलेलेच आहे. परंतू मधल्या कालखंडात हसणे आपल्या हाती आहे. चला हसत जगूया !
No comments:
Post a Comment