Thursday 25 August 2011

मराठी बोधकथा उपयोग



        पृथ्वीच्या पाठीवर विविध प्रकारची झाडे आहेत . विविध प्रकारचे प्राणी आहे . ही झाडे आणि प्राणी आपआपल्या परीने मानवाच्या उपयोगी पडतात . जिवतंपणी आणि मेल्यावर सुध्दा !
       झाड जिवंत असतांना मानवाला शुध्द हवा देते . फळे, फुले .फांद्या पाने देते . फळे ही खाण्याच्या कामी येतात . फुले सजावतीच्या कामी येतात . देवाला वाहण्यासाठी उपयोगी पडतात . झाडांच्या पानापासुन पत्रावळ्या , द्रोण अशा उपयुक्त वस्तू बसतात . काही झाडांची पाने खाण्यासाठी देखील उपयोगी पडतात .   
      झाड मेल्यावर देखील निरुपयोगी बनत नाही . झाडांच्या फांद्या जाळण्यासाठी उपयोगी पडतात . खोडापासुन घरे , खिडक्या , टेबल, खुर्ची इ . विविध उपयोगी वस्तू बनतात .
      गाय जिवतंपणी दुध देते . बैल शेतामध्ये आमच्यासाठी राबराब राबतो. गाय बैल इ. मेल्यावरही मानवाच्या उपयोगी पडतात . त्यांची कातडी , हाडे , शिंगे , केस यापासुन विविध उपयोगी वस्तू बनतात. एकंदरित झाडे , प्राणी मेल्यावरही मानवी समाजाच्या उपयोगी पडतात .
     प्रश्न असा आहे की , मेलेल्या मानवाचा उपयोग काय ? मेलेल्या माणसाचा काहीही उपयोग असल्याचे दिसुन येत नाही . माणूस मेल्यावर त्याला तात्काळ पुरावे लागते किवा जाळावे लागते . यामध्ये विलंब झाला तर मेलेल्या माणसाइतकी उपद्रवी गोष्ट दुसरी नाही .
     माणूस मेल्यावर त्याचा समाजाला काहीही उपयोग नाही. हे सत्य माणसाने जिवंतपणी समजावून घेणे गरजेचे आहे. कारण हा जन्म जर व्यर्थ जावू न द्यावयाचा असेल तर जिवंतपणीच माणसाने काही कर्तव्य केले पाहीजे . जेणेकरुन समाजाला त्याचा काही उपयोग होवू शकेल .
        जिवंतपणी जर माणूस कामी नाही आला , तर त्याला मेल्यानंतर कामी येण्याची संधी नाही . वृक्ष , गाय, बैल, यांना ती संधी आहे . म्हणून चला कामाला लागूया . या नरदेहाचा मानवी समाजाला काही उपयोग होवू देवूया ! स्वार्थ आणि आळ्स झटकून कार्यप्रवण होवूया ! मरण काय सांगून येणार आहे ?    

No comments:

Post a Comment