Sunday 2 October 2011

मराठी बोधकथा कवच




   पृथ्वीवर विविध प्रकारचे हवामान आढळते . टुड्रां प्रदेश अतिशय थंड आहे, तेथे सदैव  बर्फ़ पसरलेला असतो. लोकांना अंगावर प्राण्यांची कातडी ओढून राहावे लागते. विषुवृत्तीय प्रदेशातील वातावरण उष्ण , भरपुर पडणारा पाऊस त्यामुळे दाट जंगले . मोठमोठ्या नद्याची सुपिक मैदाने तेथे लोकांची दाटीवाटीची वस्ती कारण मैदानी प्रदेशात शेतीला चांगला वाव जेथे नफ्याची शक्यता तेथे माणसाची धाव .
    सुपिक प्रदेशाप्रमाणेच पृथ्वीवर वाळवटें देखील आहेत . वाळवंटातील जीवन अतिशय अडसर तुटपूंजा रडणारा किंवा मुळीच न पडणारा पाऊस , त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य , शेती नाही आणि पशूपालना वरही मर्यादा आलेल्या . दिवसांचे भयंकर तापमान आणि रात्री शरीर गारठवून टाकणारी थंडी . तरी माणूस मोठा जिद्दी . हटकून काही जमाती वाळवंटी प्रदेशात राहतातच !
     वाळवंटी प्रदेशातील प्राणीही मोठे मजेशिर जाड कातडीचे . उटांला तर वाळवंटातील जहाज म्हणतात . याशिवाय सरडे , साप , विंचू , अशा प्राण्यांचा वाळवंटात भरणा. म्हणजे वाईटात आणि वाईट असेच म्हणावे लागेल .
      वाळवंटातील वनस्पती पण आपले खास वैशिष्ट्य जोपासणार्‍या . खुरट्या आकाराचा आणि काटेरी वाळवंटात साप ,विंचू , सरडे याच्या सोबतीला काटेरी वनस्पतीच का ? कारण स्पष्ट आहे . जसे तुम्ही असाल तसेच तुम्हाला मित्र ही लाभतील !
    वाळवंटातील काटेरी वनस्पतीचे काटे , फळे खाण्यार्‍या प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करतात . या झाडांना जर काटे नसते , तर ही झाडे प्राण्यांनी कधीचीच नष्ट करुन टाकली असती . काटे हे या झाडांचे संरक्षण कवच आहे . हज़ारो वर्षापासून हे कवच या वनस्पतींनी जपले आहे . वाळवंटातल्या वनस्पतीप्रमाने तरुणीनाही भय आहे, ते समाजातील काटेरी माणसाचे . ही काटेरी माणसे कधी ओरबाडतील याचा नेम नाही . अंगभर कपडे हे संरक्षण करणार्‍या कवचासारखे रक्षण करणारे . फारसे लक्ष आकर्षीत होवू  न देणारे . आता हे संरक्षण कवच फेकून देण्यासाठी फॅशनच्या नावाखाली स्पर्धा लागलेली आहे . आपल्या हिताचे आपल्यालाच भान नसावे ! यापेक्षा मोठे दुदैव काय असू शकेल ?








No comments:

Post a Comment