संस्कृतमध्ये जगाला ‘ जगत ’ असे म्हटले आहे . ‘ जगत ’ या शब्दाचा अर्थ , “ जेथे सर्व काही गतिमान आहे ” आणि ते शब्दशः खरे ही आहे. म्हणुनच हे जग आहे गतिशिलता हा या विश्वाचा मुलभूत नियम आहे . या विश्वात आपल्याला सर्वत्र गतिमानता पाहायला , अनुभवायला मिळते .
विश्वामधील आकाशगंगा या गतीमान असुन त्या एक दुसर्यापासुन दुर – दुर जात असल्याचे हबल दुर्बिनीद्वारे केलेल्या निरिक्षणातुन स्पष्ट झाले आहे. काही आकाशगंगा या सर्पीलाकार असुन त्या स्वतःभोवती फिरत आहेत .
आकाशगंगामध्ये तारे फिरत आहेत . तार्यांना आपले ग्रहमंडळ असते . हे ग्रह त्या तार्यांभोवती फिरत आहेत . ग्रहांना उपग्रह आहेत . उपग्रह हे ग्रहाभोवती फिरत आहे.
विश्वातील प्रत्येक पदार्थ हा अणूंपासुन बनविला आहे. या अणुंमध्येही गतीशिलता प्रत्ययास येते .अणूच्या केंद्राकामध्ये असणार्या प्रोट्रोन आणि न्युट्रोन भोवती इलेक्ट्रोन प्रकाशाचा वेगाने फिरत आहे .
पिंडी पासुन ब्रम्हाडापासुन सर्वत्र गतीशिलता आहे आणि ही गतीशिलता आहे. म्हणुनच जीवनाचे अस्तित्व आहे .
पण माणुस मात्र वेगळ्या दिशेने वाटचाल करतोय . त्याने वाहनांचा शोध लावला आणि स्वतःचालणे थांबविले . यंत्राची व वाहनाची गती वाढली , माणसाची मात्र खुंटली कामाच्या नावाखाली माणसे एकाच जागी खुर्चीत तासनतास बसुन राहतात . गती हे जीवनाचे , तर स्थिरता हे मृत्युचे लक्षण . माणसाची ही गतीहिनता त्याला अनेक व्याधी जडण्यास कारणीभूत ठरते . कामाच्या नावाखाली एकाच जागी स्थिरावलेल्या माणसाला खुर्चिचे अनेक रोग जडतात .
या रोगांपासून मुक्तता मिळवावयाची असेल , तर विश्वाचा मुळाशी असणारा गतीशिलतेचा नियम माणसांनी पाळला पाहिजे. निदान सकाळ – संध्याकाळ तरी काही वेळ पायी फिरले पाहिजे . अन्यथा गतिहिनता विनाशाकडे नेल्याशिवाय राहणार नाही .
बोध कथेत सत्यच सांगितले आहे. आपला लोकांच्या प्रबोधनाचा मार्ग स्तुत्य आहे,
ReplyDelete