Friday 7 October 2011

मराठी बोधकथा धार्मिकता


       वृक्षाचे महत्त्व सांगणारी अनेक सुभाषिते संस्कृत भाषेमध्ये आहेत . वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे संत तुकारामांनी म्हटले आहे. अनेक कवींनी झाडे वेली यांच्यावर कविता केल्या आहेत.
     झाडे आहेतच तशी महत्त्वपुर्ण . झाडे आहेत म्हणुन जीवन आहेत . ज्या दिवशी झाडे संपतील त्या दिवशी पृथ्वीवरील जीवन संपलेलं असेल . मागे उरतील ओस पड्लेले मोठमोठे कारखाने !
      आमच्या संस्कृतीमध्ये झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासींच्या गुफाचित्रामध्ये झाडे रेखाटलेली आढळतात . वारल्यांच्या चित्रामध्ये झाड हमखास असतात. झाडे आडनाव असणारी माणसे आमच्याकडेही आहेत . कंदब , आंबेवडे , पिंपळगावकर , वडगाव , पिंपळगाव अशी झाडांची नावे असणारी गावे ही हमखास सापडतात.
       आमच्या प्रत्येक धर्मामध्ये झाडांना महत्त्व आहे . मुस्लिम धर्म आणि खजुराचे झाडे यांचे नाते आहे. ख्रिश्चनांना ख्रिसमस ट्री प्राणप्रीय तर बौध्दांना बोधिवृक्ष पुजनीय वाटतो . वटसावित्रीला हिंदु महिला वडाच्या झाडाची पुजा करतात. सणप्रसंगी आब्यांची पानांचेच तोरण लावले जाते . तुळशीवृदांवन प्रत्येक हिंदुच्या घरी हमखास सापड्ते .  शिवाय उबंर , पिंपळ इ. झाडे देखिल हिंदु धर्मात पवित्र मानलेली आहेत.
        झाडाप्रमाणेच आम्ही माणसे प्रतिमेमध्ये ही देव पाहतो . परंतु प्रतिमा निर्जिव  असते व झाड जिवंत असते. निर्जिव असणार्‍या प्रतिमेची थोडी विटंबना झाली, तर त्या त्या धर्मियांच्या भावना उफ़ाळून येतात . लोक रस्त्यावर उतरतात. रास्ता रोको करतात . परंतु धर्मामध्ये महत्त्वपुर्ण स्थान असणारे जिवंत झाड कुणी तोडले तरी फारशी दखल घेत नाही . स्वतःला धार्मिक  म्हणवणारे आम्ही सर्वच धर्माचे लोक , आमच्या डोळ्यादेखत झाडांची कत्तल होतांना तरी आम्ही स्वस्थ बसून राहात असू , तर स्वतःला धार्मिक म्हणवण्याचा आम्हाला खरोखरच काही नैतीक अधिकार उरतो काय ?



No comments:

Post a Comment