विश्वाच्या निर्मितीच्या अनेक सिध्दांतापैकी अत्यंत महत्त्वपुर्ण आणि मान्यता पावलेला सिध्दांत म्हणजे “ महास्फोटाचा सिध्दांत ” अर्थात बिग बॅग थेअरी . निर्मितीच्या पुर्वी विश्व हे एका बिंदूमध्ये सागावले होते. त्या बिंदुचा स्फोट झाला . त्यामधून द्रव्य बाहेर पडले. स्फोटामूळे हे द्रव्य एकदुसर्यापासुन दुर जावू लागले. दाही दिशांना हे द्रव्य पसरले . त्या द्रव्यापासून आकाशगंगा , तारे , ग्रह , उपग्रह , धुमकेतू , अशनी , या सर्वाची निर्मिती झाली. महास्फोटातुन निर्माण झालेले हे विश्व त्याच्या जन्मापासून आजपर्यंत प्रसरण पावत आहे. आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत . प्रसरणशिलता हे या विश्वाचे व्यवछेदक लक्षण आहे. त्याचा विस्तार होण्यातच त्याचे अस्तित्व लपलेले आहे. एका अर्थाने या विस्तारानेच जिवन जन्माला घातले आहे. विस्तार म्हणजे जीवन आणि आकुंचन म्हणजे मृत्यु !
झाडाची बी आम्ही जमीनीच पुरतो . तिला पाणी घालतो . ‘ बी ’ ला कोबं फुटते, त्यापासून डेरेदार झाड तयार होते . तयार झालेले हे झाड त्या बिजाचाच विस्तार आहे . असा कोणी कल्पनाही करु शकनार नाही की इवल्याशा बिजामध्ये एवढा मोठा वृक्ष लपलेला असेल . परंतु जेव्हा ते बिज विस्तारीत होते, तेव्हा वृक्ष आकाराला येतो . जिवन जन्माला येते .
मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी हे बिजाचाच विस्तार आहेत . झाडाचे बी जमीनीत पेरले जाते आणि प्राण्यांच्या बिजाची जोपासना गर्भाशयात होते . गर्भाशयात बिजाचा विस्तार होतो आणि जीवन आकाराला येते .
जीवनाच्या मुळाशी विस्तार असल्याचे सर्वत्रच दिसुन येते . परंतु विकास झाला म्हणणारी माणसे इतरांपासून तुटत जातात . नातेवाईक - मित्र यांचा पसारा कमी होतो . आकुंचीत होतो . विस्ताराच्या विरुध्दची क्रिया सुरु होते . आणि जीवनाच्या मुळाशी तर विस्तार आहे . समाजापासून तुटणारी ही माणसे खरोखरच विकासाकडे जातात की विनाशाकडे ?
No comments:
Post a Comment