Sunday 4 September 2011

मराठी बोधकथा विरह



       मार्च महीण्याचा मध्यकाळ होता . रविवारचा दिवस होता . दुपारची वेळ होती . दुपारच्या रणरणीत उन्हात जाणार तरी कोठे?मी घरीच होते . घरची सगळी मंडळी बाहेरगावी गेलेली . उन्हाळा जाणवत होता . ए.सी नाहीच म्हणून लावण्याचा प्रश्नच नव्हता . कुलर अद्याप बाहेर काढला नव्हता . सातत्याने डोक्यावरचा पंखा तेवढा फिरत होता . पंख्याची हवा गरम वाटत होती .
            बराचकाळ पंख्याची ती गरम हवा मी घेत होते. पण आता असाह्य झाले होते . या उष्ण वातावरणावर काही उपाय सापडत नव्हता . कंटाळून मी पंखा बंद करुन टाकला. तशीच खोलीमध्ये खुर्चीवर बसुन राहीली . पंख्यापासुन येणारी हवा बंद झाल्यामुळे अंगाला घामाच्या धावा लागल्या . उष्णता असह्य वाटू लागली . आता पुन्हा मी पंखा सुरु केला . आणि काय तो चमत्कार पंख्याची हवा एकदम गार वाटू लागली .
         डोक्यात विचारचक्र फिरु लागले . आधीही पंखा फिरत होता . हवा येत होती . तेव्हा ती हवा गरम येत होती . आता थंड वाटत आहे . हे कसे ? उत्तर सापडले , विरह . पंखा आधीपासुन सुरु होता . त्यामुळे त्याने केलेले काम जाणवत नव्हते . पंखा बंद केला घामाच्या धारा वाहू लागल्या . पंखा सुरु केला पुन्हा हवा वाहू लागली . घामाच्या धारा बंद झाल्या .
       अशावेळी , बायकोला कंटाळला असाल तर तिला पंधरा दिवसांकरिता माहेरी जावू द्या . तीचे महत्त्व कळेल . नवर्‍याला कंटाळला असाल  तर तुम्ही काही दिवस त्याच्यापासुन दुर राहून बघा ! नौकरीला कंटाळला असाल तर एक महिण्याच्या रजेवर जा . एक महिना बिनकामाचे बसुन राहा . तीच नौकरी प्रिय वाटू लागेल . बायकोला हातचा स्वयंपाक चविष्ट वाटत नसेल तर चार महिने मेसचा डबा लावा . मग तो डबा बेचव वाटू लागेल . आणि बायकोच्या हातचा स्वयंपाक चविष्ट वाटू लागेल. सगळी विरहाची महिमा !
     थोडक्यात सांगायचे तर अनेक महत्त्वपूर्ण आणि मोल्यवान गोष्टी आमच्या आजूबाजूला असतात . हवा , पाणी , मुबलक प्रमाणात आणि विनासायास मिळतात . म्हणून आम्हाला कधी त्यांचे महत्त्व वाटत नाही . आणि आम्हीही त्यांची किंमत करत नाही . हाच नियम माणसांनाही लागू होतो . मिनिटभर हवा मिळाली नाही की , हवेचे महत्त्व पुरेपूर पटते ! माणसांनाही तसेच ती दुर गेल्यावरच त्यांचे खरी किंमत कळते .





No comments:

Post a Comment