Sunday 4 September 2011

मराठी बोधकथा विरह



       मार्च महीण्याचा मध्यकाळ होता . रविवारचा दिवस होता . दुपारची वेळ होती . दुपारच्या रणरणीत उन्हात जाणार तरी कोठे?मी घरीच होते . घरची सगळी मंडळी बाहेरगावी गेलेली . उन्हाळा जाणवत होता . ए.सी नाहीच म्हणून लावण्याचा प्रश्नच नव्हता . कुलर अद्याप बाहेर काढला नव्हता . सातत्याने डोक्यावरचा पंखा तेवढा फिरत होता . पंख्याची हवा गरम वाटत होती .
            बराचकाळ पंख्याची ती गरम हवा मी घेत होते. पण आता असाह्य झाले होते . या उष्ण वातावरणावर काही उपाय सापडत नव्हता . कंटाळून मी पंखा बंद करुन टाकला. तशीच खोलीमध्ये खुर्चीवर बसुन राहीली . पंख्यापासुन येणारी हवा बंद झाल्यामुळे अंगाला घामाच्या धावा लागल्या . उष्णता असह्य वाटू लागली . आता पुन्हा मी पंखा सुरु केला . आणि काय तो चमत्कार पंख्याची हवा एकदम गार वाटू लागली .
         डोक्यात विचारचक्र फिरु लागले . आधीही पंखा फिरत होता . हवा येत होती . तेव्हा ती हवा गरम येत होती . आता थंड वाटत आहे . हे कसे ? उत्तर सापडले , विरह . पंखा आधीपासुन सुरु होता . त्यामुळे त्याने केलेले काम जाणवत नव्हते . पंखा बंद केला घामाच्या धारा वाहू लागल्या . पंखा सुरु केला पुन्हा हवा वाहू लागली . घामाच्या धारा बंद झाल्या .
       अशावेळी , बायकोला कंटाळला असाल तर तिला पंधरा दिवसांकरिता माहेरी जावू द्या . तीचे महत्त्व कळेल . नवर्‍याला कंटाळला असाल  तर तुम्ही काही दिवस त्याच्यापासुन दुर राहून बघा ! नौकरीला कंटाळला असाल तर एक महिण्याच्या रजेवर जा . एक महिना बिनकामाचे बसुन राहा . तीच नौकरी प्रिय वाटू लागेल . बायकोला हातचा स्वयंपाक चविष्ट वाटत नसेल तर चार महिने मेसचा डबा लावा . मग तो डबा बेचव वाटू लागेल . आणि बायकोच्या हातचा स्वयंपाक चविष्ट वाटू लागेल. सगळी विरहाची महिमा !
     थोडक्यात सांगायचे तर अनेक महत्त्वपूर्ण आणि मोल्यवान गोष्टी आमच्या आजूबाजूला असतात . हवा , पाणी , मुबलक प्रमाणात आणि विनासायास मिळतात . म्हणून आम्हाला कधी त्यांचे महत्त्व वाटत नाही . आणि आम्हीही त्यांची किंमत करत नाही . हाच नियम माणसांनाही लागू होतो . मिनिटभर हवा मिळाली नाही की , हवेचे महत्त्व पुरेपूर पटते ! माणसांनाही तसेच ती दुर गेल्यावरच त्यांचे खरी किंमत कळते .





Thursday 1 September 2011

मराठी बोधकथा सवय




        मानवाच्या इतिहासातील सर्वात क्रांतीकारी घट्ना म्हणजे मानवाला लागलेला शेतीचा शोध . जर मानवाला शेती कशी करावयाची याचे तंत्र अवगत झाले तर कदाचीत मानवाने आज रोजी जेवढी प्रगती केलेली आहे . तेवढी प्रगती मानव कदाचीत करु शकला नसता .
      शेती करण्याच्या तंत्राणेच मानवाच्या असंख्य पिढ्या जगवल्या आहेत . शेती पाहायला मला खुप आवडते . विशेषत: शेतकरी जेव्हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबवतात तेव्हा अशा शेतकर्‍यांच्या शेताला भेट देण्याची उत्सुकता वाटते . कुणी मोठ्या आकाराचे फळ येणारी पपई लावलेली असते . कुणी अधिक उत्पादन देणारी टमाटरची जात लावलेली असते . कुणी वाग्यांचे विक्रमी उत्पादन घेतलेले असते .

      शेती उत्पादनासोबतच शेतकरी इतर ही नाविण्यपुर्ण उपक्रम राबवतात . एका शेतकर्‍याने तर चक्क अर्ध्या एकरामध्ये शेततळे खोदुन त्यात मत्स्यशेती केल्याचे मला आढळून आले. सिंचनाच्या आधुनिक उपकरणांचा वापर करुन पाण्याची बचत करणारे व कमी पाण्यावर अधीक पिक घेणारे शेतकरी देखील भेटले .
       अशीच एकदा संत्र्याचा बागेला भेट दिली . बागेत निंदण सुरु होते . बाया गवत काढुन टाकत होत्या . ते पाहुन माझ्या मनात विचार आला.  संत्री , पेरु , सफरचंद ही उपयुक्त फळ झाडे वाढवावी लागतात . त्यांच्या कलमा तयार करा , डोळे बांधा , लावा, मशागत करा , खत पाणी घाला . तेव्हा कुठे ही झाडे जगतात . चांगल्याचे संवर्धन करावे लागते . वाईट असणारे , नको असणारे , गवत मात्र आपोआप वाढते . त्याच्या वाढीसाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही . तर ते काढुन टाकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
       फळझाडे ही मला चांगल्या सवयीसारखी वाटतात . त्यांची जोपासना आणि संवर्धन करावे लागते . गवत हे वाईट सवयी सारखे . थोडे दुर्लक्ष झाले की फोफावणारे !